हे चित्र आहे 2005 सालाचे व शेवटचा फोटो आहे 2017 साल चा
दि 2 ऑगस्ट 2005 दुपारी साधारण दुपारची वेळ होती त्या वेळी मुसळधार पाऊस झाला, त्या मुळे बाणेर येथे घराघरात पाणी शिरले होते कपिल मल्हार सोसायटी मध्ये साधारण 4 ते 5 फूट पाणी साचले तेथील नागरिक भयभीत झाले होते त्या वेळी मी माझे आनेक मित्र त्या ठिकाणी पोहचले,पाण्यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले,माझ्या बरोबर सागर ताम्हाणे होते,त्या वेळचे नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर होते ते हि पाण्यात उतरून काम करताना मी पाहिले आहे त्यांचाच आदर्श आम्ही घेत आहोत,आणि हा फोटो ज्यांनी काढला ते माझे मित्र अमर लोंढे त्यांचे मी आभार मानतो ते स्वतः त्या लोकांच्या मदतीसाठी धावपळ करत असताना त्यांनी हा क्षण कॅमेरा मध्ये कसा घेतला असेल देव जाणे,मुळात आम्हा सर्वांना पूर्वी पासून समाजकारणाची आवड आहे,तो आमचा पिंडच आहे
 (हि आठवण काल आलेल्या पाऊसा मुळे झाली काल मुबई बँगलोर हायवे लगत असलेल्या अंडरपास मध्ये पाण्यात अडकलेल्या गाडी काढताना हा प्रसंग डोळ्या समोर आला )


Image may contain: 2 people, people smiling, people standing, child, outdoor and water

Comments

Popular posts from this blog